- पुणे जिल्हयातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी दरवर्षी शालेय साहित्य वाटप करणे.
- सर्व समाजातील गोरगरीब हुशार विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवणे.



आपल्या हिंदू संस्कृतीत नराचा नारायण होणे अशी एक संकल्पना आहे. त्याप्रमाणे मूलभूत सुविधांपासून वंचित असणाऱ्या दुर्लक्षित उपेक्षित समाज बांधवांविषयी समाजातील सर्वांच्या मनात आत्मीयता व प्रेमभाव निर्माण करून सेवाकार्याद्वारे अशा वंचित घटकांना बळ देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे यावर संस्थेच्या कार्याचा भर आहे.

